विशेष काही....
काही उल्लेखनीय वाटणार्या गोष्टींचा आढावा इथे दिला जाईल. १) एमसीएक्स-एसएक्स चे मराठी बेवस्थळ २)परिवहन विभागाची ऑनलाईन लर्निंग लायसन्स सोय ३) डॉ. प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्पमहत्वाचे
तुम्ही जर भ्रमणध्वनी वापरत असाल आणि आलेल्या एसेमेसवर पैसे मिळवायची इच्छा असेल तर इथे नोंद करा.
———
लेख वाचण्यात अडचणी येत असल्यास…
एखादा लेख तुम्ही वाचू शकत नसाल तर हे फॉन्ट आपल्या संगणकावर डाऊनलोड करून घेऊन ;इन्स्टॉल करून घ्या. ही अनुदिनी ऑपेरा या ब्राऊजर वर उत्तम दिसेल. 
—————
अवश्य पहा
तुम्हाला संगणकावर मराठी वाचायला आवडतं, लिहिणा-याने हे कसं काय लिहिलं (टंकल) याचे आश्चर्यही वाटतं, पण स्वत: प्रयत्न करायला मात्र धीर होत नाही. इथे भेट द्या, तुमच्या अडचणी मांडा आणि मार्गदर्शन मिळवा.
पाणी समस्येसंदर्भात पालिका प्रशासनाने नगरसेवकांना पाठवली प्रश्नावली
पाणी समस्येसंदर्भात पालिका प्रशासनाने नगरसेवकांना पाठवली प्रश्नावली
प्रतिनिधी
मुंबई शहरात घरगुती पाणीपुरवठय़ात करण्यात आलेली पंधरा टक्के पाणीकपात आणि तलावातील कमी होणारा पाणीसाठा यामुळे पालिका प्रशासनाने पाणीबचतीसाठी विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. त्याचा एक भाग म्हणून पालिका प्रशासनाने नगरसेवकांना एक प्रश्नावली पाठवली आहे.
दरम्यान समुद्राचे पाणी पिण्यासाठी वापण्याबाबत चर्चा सुरु झाली असून ‘बीएआरसी’कडे समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रस्तावाबाबत प्रशासनाने चर्चा करावी, अशी सूचना शिवसेनेचे नगरसेवक राहूल शेवाळे यांनी प्रशासनाला केली आहे.
आपापल्या प्रभागात होणारी पाणीगळती व चोरी, पाण्याचे नवीन स्त्रोत निर्माण करणे, पाणीबचतीचे विविध उपाय, शहरातील जुन्या विहिरी आणि बोअरवेलची दुरुस्ती व त्याचा पिण्याव्यतिरिक्त अन्य कामासाठी होऊ शकणारा वापर आदी विषयांवर हे प्रश्न विचारण्यात आले आहेत. प्रशासनाकडून पाठविण्यात आलेली ही प्रश्नावली नगरसेवकांनी भरून द्यावी आणि सूचनाही कराव्यात, असे प्रशासनाने या पत्रात म्हटले आहे.

|
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा
Contact Me ![]()
![]()
![]()
![]()
![]()
|
|
श्री दिपलक्ष्मी च्या दिवाळी २००९ अंकाच्या संपादकीय मध्ये माझ्या या ब्लॉगचा छापील उल्लेख वाचून आनंद झाला. पण त्यात दिलेली माहिती थोडी चुकीची होती. अर्थातच तसे ईपत्र मी संपादकांना पाठवले आहे. पाहूया काय उत्तर येते त्यांचे.
श्री. हेमंत रायकर यांस,
आपला दिवाळी२००९ चा ’श्री दिपलक्ष्मी’ चा अंक नुकताच वाचनात आला. त्यात तुमच्या संपादकीय लेखात माझ्या www.majhimarathi.wordpress.com या मराठी ब्लॉगचा उल्लेख पाहून थोडे आश्चर्य वाटले. एक तर आपला काहीच पूर्वपरिचय नाही, किंवा छापण्यापूर्वीही आपला काही संपर्क झाला नव्हता. दुसरं म्हणजे ज्या संकेतस्थळांबरोबर आपण माझ्या ब्लॉगचा उल्लेख केलात ; ती सगळी फारच मातब्बर संकेतस्थळे आहेत. त्यांच्या पंक्तीत बसण्याची माझी योग्यता नाही. अर्थात् त्यांच्याशेजारचे मिळालेले स्थान किंवा माझ्या ब्लॉगचा जाहीर उल्लेख सुखावून गेला हे खरेच. आपल्या करत असलेल्या कामाची कोणीतरी दखल घेतली ह्याचा आनंद शब्दातीत आहे.
परंतु आपण ज्या कामाकरता माझ्या ब्लॉगची दखल घेतल्याचे छापले आहे, त्या बाबत एक चूक झाली आहे. अजून तरी मी कोणताही ई दिवाळी अंक प्रकाशित केलेला नाही( पण इतरांच्या ई-दिवाळी अंकाचे दुवे माझ्या ब्लॉगवर दिले आहेत). मात्र सध्या एका डिजीटल अंकाची पिडीएफीय आवृत्ती करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. याव्यतिरिक्त मराठीपुस्तके.ऑर्ग या संकेतस्थळाकरता कॉपीराईट कायद्याच्या कक्षेबाहेर असलेली पुस्तके डिजिटल रूपात आणण्याकरता कार्यरत आहे.
असो, मुळात मराठी वाचकांनी दोन लाखांच्या वर भेट देऊन गेलेल्या माझ्या ब्लॉगची शान मात्र एका छापील अंकाने घेतलेल्या दखलीमुळे आता वाढली आहे.
माझी दुनिया
बाबा आमटयांविषयी माहित नसलेला माणूस विरळाच. कुष्ठरोग्यांकरता आनंदवनाची उभारणा त्यांनी केली. त्याकरता बाबा आमटे स्वत:, साधनाताई आमटे, त्यांचे दोन्ही पुत्र डॉ. विकास आणि डॉ.प्रकाश या सगळ्यांनीच आनंदवनाला वाहून घेतलं. मला स्वत:ला ही इतकीच माहिती होती. परंतु नुकतच डॉ. प्रकाश आमटयांचं ’प्रकाशवाटा’ हे पुस्तक वाचनात आलं आणि हे आमटे कुटुंबिय किती असाधारण आहे याचा प्रत्यय आला.
बाबांना आनंदवनात मदत करावी या हेतून डॉक्टरकी पास झालेल्या मुलांच्याकडून मात्र बाबांच्या काही वेगळ्याच अपेक्षा होत्या. आनंदवनापासून जवळपास २५० किमी अंतरावर भामरागड इथल्या हेमलकसा इथे कसलीही सुविधा नसलेल्या आदिवासी जनतेचे वास्तव्य होतं. त्यांच्या पुनर्वसनाचा निश्चय बाबांनी केला होता. एकंदर बांबाचे वय पाहाता , ही जबाबदारी मागचा पुढचा कसलाही विचार न करता डॉ.प्रकाश आमटे यांनी स्वत:वर घेतली. प्रकाशवाटा हे पुस्तक नुसतंच वाचून संग्रही ठेवण्यासारखे नाही. आपलं सुखासुखी जीवन सोडून अपरिचित परिसरातल्या अपरिचित लोकांकरता सगळं सर्वस्व देणं ही सोपी गोष्ट नाही. कसल्याही पायभूत सुविधा उपलब्ध नसतानाही आज हेमलकसा इथे ’लोक बिरादरी प्रकल्प’ उभा राहिला आहे.
नुसते बाबा , साधनाताई , डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश यांच्यापुरतंच हे जगणं मर्यादित नव्हतं तर त्यांच्या सुना, नातवंड आणि नातसुनाही तेवढयाच तन्मयतेने यात कार्यरत आहेत. ते पाहिलं की कोणत्या मुशीतून हे कुटुंब घडलंय याचा अचंबा वाटतो. डॉ. प्रकाश यांनी मंदाताईंबद्दल म्हटलेले एक वाक्य खूप काही सांगून जाते. ” सीतेला तरी कांचनमृगाचा मोह झाला, मंदाला कसलाच मोह झाला नाही.” हेमलकसा इथे वीजेची सोय नव्हती, आपला मुलगा-सून अशा गैरसोय़ीत राहातात म्हणून साधनाताई आनंदवनात पंखा वापरत नव्हत्या. इथल्या भागातल्या अगदी सरकारी कर्मचार्यांनाही नक्षलवाद्यांची भिती आहे. पण आमटे कुटुंब इथल्या लोकांना देवदूतासमान आहेत.
माझ्यासकट अनेकांना या ’लोक बिरादरी प्रकल्पाबद्दल ’ माहिती नव्हती, नाहिये. त्यांच्याकरता मी इथे काही विडीयोज देत आहे. अनेक परदेशी संस्थांनी आजवर या प्रकल्पाकरता मदत केली आहे. पण अजूनही या प्रकल्पाकरता मदतीचा हात हवा आहे.





