ब्रम्हांडनायक
मला वाटे आपण शेंदरी गुलाब व्हावे,
भक्तांनी स्वामी चरणी मजला अर्पावे.
मला वाटे आपण बेल-तुळस व्हावे,
भक्तांनी स्वामी मस्तकी मजला अर्पावे.
मला वाटे आपण हीना अत्तर व्हावे,
भक्तांनी स्वामींना प्रेमाने लावावे.
मला वाटे आपण बेसन लाडू व्हावे,
भक्तांनी स्वामींना नैवेद्यांत अर्पावे.
मला वाटे आपण निरांजन वात व्हावे,
भक्तांनी भक्तीने स्वामीसी ओवाळावे.
पण आता वाटते आपण कापुरच व्हावे
स्वामींच्या कर्पूर आरतीत शून्य होऊनी जावे.
२८.९.२००१ स्वामीनामधारक
गेले काही दिवस सातत्याने मला वाचकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. ज्या वाचकांना स्वामींचे हे फोटो आणि कविता हवी आहे त्यांच्या इच्छेनुसार एक पीडीएफ फाईल इथे तयार केली आहे.


great
good.
i’ll also try and blog in marathi, but i think it is too difficult to type in marathi.
khup chan
marathi is the best. It is nice to see maharashtrian guys are blogging on wordpress.com
It is global platform. Please visit raipurem.wordpress.com
wow…. computer var awami samarth… thanks
It’s nice to see marathi florishing through internet………content of the site are very nice…….tried to cover all subjects……..It’s nice experience to surf ” majhi marathi”………I’ll like to visit again n again to read it’s updated contents….
Wishing all the team of “majhi marathi” great luck …. all the best….
Mukund Dhokrat, Nasik
Om Raktand Raktavarna Padmanetre Suhasyavadanam, Kantha Topich Mala Dandakamandaludhar, Kantyakarrakshak Traygunyarahit Trailokyapalak Swami Samaratha Avatardharak Pahi Mam Pahi Mam Pahi Mam…..
Sri Swami Samartha!
Dear All,
I need your views on Genration Gap. If you can express your views they are most welcome.
मी मराठी type करीन, पण कठिण आहे.
changli kavita sawmi jina aarpit
i need this brahmandnayak kavita with all swami samarth pictures. can u please send me on my email address.
It would be nice to have closeness of Sree Swami Samarth
||श्री स्वामी समर्थ||
सुरेख जमलय
i need this bramhandnayak kavita with all swami pict. can u please send me on my email address. plz it’s very urgent
Thank you
I am very much impress with swami’s photoes and poem. pl send something more on this line
thank you for accepting my mail
good
|| प्रस्तावना ||
व्यवहारात कोणतेही कार्यसिध्दी प्राप्त होण्यासाठी अभ्यासाची आवश्यकता असते.
अभ्यास नित्यएनियमाने चालु राहील तरच कार्यसिध्दी होउ शकेल. भगवंताने गीतेत सांगितले आहे–
” अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् |
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय || ”
— गीता १२.९
अभ्यास नित्यनियमानें करणें हेच सर्व बाबतींत श्रेयस्कर कार्य होय. अभ्यास नित्यनियमाने चालवित असता देहाला, इंद्रियांना व मनाला एक प्रकाराचे नियमित वळण लागते व त्यायोगे इंद्रिये व मन कार्यक्षम बनूं शकतात.
परमार्थमार्ग हा प्रापंचिकांना फारच अवघड वाटतो, कारण नित्याच्या प्रापंचिक व्यवहारापुढे पारमार्थिक कार्याचा बोजा वाढवून घेणे त्यांना शक्य नसते व सतत प्रापंचिक व्यवहाराच्या मार्या्मुळे इच्छा असूनसुध्दा पारमार्थिक उपासना करणे दुर्लभ घडते. परंतु प्रापंचिक व्यवहाराप्रमाणेंच जर पारमार्थिक उपासनेचा नित्यनियमित अभ्यास सुरु झाला तर पारमार्थिक उपासना हाही भाग प्रापंचिकांना नित्याच्या व्यवहारातील एक विषय होउन बसेल आणि म्हणुनच यासाठी उपासनेचे वळण लावण्यासाठी नियमित अभ्यासाची आवश्यकता आहे.
” नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्मकर्मणः |
शरीरयात्राऽपि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ||
— ३.८
यावरुन नियमित उपासनेची आवश्यकता पटेल यात शंका नाही. साधुसंतांनी प्रापंचिक लोकांचे ह्या लोकी कल्याण होण्यासाठी भक्तिमार्गाची अनेक साधने निर्माण केली आहेत. तथापि प्रपंचांचा बोजा चालविण्यार्यां ना साधनांची महती समजुनसुध्दा, ते साधना करु शकत नाहीत. याचे कारण एकच की, त्यांना अभ्यासाचे वळण लागण्यासाठीच नित्यनियमित साधनांचा अभ्यास घडला पाहिजे. अशा प्रकारे साधनांचा नियमित अभ्यास करणें यालाच ” नित्यनियम ” म्हणावें.
साधनाचा नित्यनियमित अभ्यास करीत असता,
” जैसा शरत्कालु रिगे | आणि सरिता वोहटूं लागे | तैसे चित्त काढेले वेगें | प्रपंचैनि || ” ….. अथवा …..
” विषयी विसर पडला नि:शेष | अंगी ब्रम्हारस ठसावला || ( अंभग )
हा अनुभव साधकास प्राप्त होतो. साधनाचे नित्यनियमित व्रत चालू ठेवले अथवा चालू राहिले तर साधकास खडतर तपश्र्व्रर्येची सुद्धा आवश्यकता भासणार नाही व प्रपंचांचे नित्याचे व्यवहार चालवीत असताना सुध्दां साधक सिध्दस्थितीस जाऊन पोहचतो व त्याला भक्तीज्ञान आणि वैराग्य यांचा आपोआप अनुभव येत जातो.
बालपनापासून तो थेट वृध्दावस्थेपर्यत पोहोचलेल्यांना जे काही व्यवहारातिल ज्ञान प्राप्त झाले असले तेही त्यांच्या नित्यनियमाच्या आचरणाचे फल होय. अशा रीतीनें नित्यनियम चालू राहिला तर परमार्थसाधन कठीन आहे असे वाटणार्यांचना पण परमार्थ सहज, साधा व सोपा विषय आहे याची जाणीव झाल्याशिवाय रहाणार नाही.
संजिव ( संग्राहक )
नित्यनियम कसा करावा?…
नित्य नियमानें इष्ट देवता प्रसन्न होऊन ध्येयाच्या निश्र्चानें पुढे पाऊल पडण्यासाठी तो कसा करावा समजणें जरुरीचे आहे. यासाठी काहीं उपयुक्त सूचना पुढें देंण्यात येंत आहेत.
१) नित्य- नियम अर्थाकडे लक्ष देऊन म्हणावा. २) नित्य-नियम शक्य तितका सावकाश प्रेमळ भावानेनें म्हाणावा व करावा.
३) नित्य्-नियम हेंच त्याचें नांव असल्यानें तो निंत्य, नियमितपणें, नियमितवेळी केलाच पाहिजे.
४) काहीं विशिष्ट अड्चणीमुळे सर्व नित्यनियम वरिल प्रमाणे करणें (म्हणणे) श्क्य नसेंल तर श्रींनी समक्ष ठरवून दिलेला भाग तरी वरील तत्त्वत्मक सूचनांस अनुसरुन करणें फार जरुर आहे. ” पंजाबमेलप्रमाणें” वेठीनें केलेल्या’ नित्य्-नियमानें ध्येयाकडे प्रगति होणे शक्य नाही.
” यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत|”
— गीता ४.७..
जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आली अथवा धर्माला र्हा स झाला त्या त्या वेळी भगवान विष्णूने वेगवेगळी रुपे धारण करुन ॠषी मुनी, पृथ्वीवर आणि लोंकाचे आपल्या दैवी सामर्थ्याने रक्षण केले. पृथ्वीवर अनाचार माजला की सर्व ॠषी मुनी आणि इतर देवादिक मंडळी क्षीरसागराच्या ठिकाणी जाऊन भगवान विष्णुची प्रार्थना करीत आणि नतमस्तक होवून विनवणी करत असत की देवा पृथ्वीवर माजलेला हा अनाचार, दुष्ट प्रवृत्ती या सर्व गोष्टीचा नाश कर आणि आम्हाला भयमुक्त कर. त्या प्रमाणे भगवान विष्णूनी प्रत्येक अवतारामध्ये दुष्ट प्रवृत्तीचा, आसुरी शक्तिचा नाश करुन सर्वाना प्रत्येक वेळी सदाचाराकडे नेण्याचे आर्दश दाखवून दिलेत. आपण ग्रंथातून, कीर्तनातून, दूरदर्शन माध्यमाव्दारे रामायण, महाभारत, कृष्ण या मालिकेतून पहातो, ऐकतो, तरीपण आजच्या या कलियुगामध्ये आम्हा मानवात काही बदल होतो आहे का? विज्ञानवादी आणि देवचे अस्तिव नाहीच म्हणणारी काही मंडळी भगवान अवतार धारण करतात का? आणि खरोखरच भगवान अवतार धारण करणार असतील तर ते आपले अवतार कार्य कधी सुरु करणार असे विचारणारे लोक आहेत. आम्हा मानवांचे आयुष्य शंभर वर्ष विधात्याने नक्की केलेले जवळजवळ आहे. वय वर्ष शंभर पुढील काळ हा हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच मंडळीना मिळतो. मग या मिळालेल्या आयुष्यात नराचे नारायण होणे श्क्य आहे काय? याचे उत्तर खरोखरच मानवाने दैवी शक्तिचे चिंतन, मनन आणि सत्संगाची कास धरल्यास निश्र्चितच मिळेल. सध्या मानव बहुतांशी भैतिक गोष्टीत रत झालेला आहे. तरीपण मानव संकट्ग्रस्त झाला की मात्र तो कोणात्याही भैतिक सुखाचा विचार न करता सत्संगाचा, दैवी शक्तिच्या नामस्मरणाचा, जपानुष्ठानाचा व इतर धार्मिक कार्याचा विचार करु लागतो. आपल्या वाट्याला आलेली संकटे, दु:खे दूर कशी होतील, आपल्याला मानसिक समाधान कसे मिळेल हे विचार सातत्याने मनामध्ये येत राहातात आणि मग गीतेमधील भगवंतानी सांगितलेला श्र्लोक –
” परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम,|
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||”
— गीता ४.८
सदरचा श्र्लोक केव्हातरी ऐकलेला, वाचलेला स्मरु लागतो. यातून काहीतरी आयुष्यात देवाचे, सध्द्गरुचे एखाध्या संप्रदायाचे पाईकपणा स्वीकारणे हे अत्यंत जरुरीचे आहे असे वाटते. संत श्रेष्ठ कबीर सांगतात-
” दु:खमें सुमरन सब करे सुखमे करे न कोय |
जो सुखमें सुमरन करे, तो दु:ख कहॅ|से होय ||”
माझ्या सारख्या पारमार्थिक सेवकाला असे वाटते ही भगवान विष्णू यांनी प्रत्येक युगात सत्प्रवृत्तीचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळे रुपाने अवतार घेतले. आजच्या घडीला जर विचार केला तर मनःचक्षुसमोर उभे राहातात ते भगवान ” दत्तात्रेय ” ( ब्रह्मा निष्णू महेश ) उत्पत्ती, स्थिती, लय, या तिन्ही दैवी शक्तींनी अनसूया माता व अत्री पिता यांच्या ठिकाणी दत्तात्रेय या नावाने अविनाशी अवतार धारण करुन ” जे का रंजले गाजलें, त्यासी म्हणे जो आपुले” अशा प्रकारे लोकाचे कल्याण करुन आपल्या अवताराची समाप्ती न करता अमाजापादून काही काळ दूर राहाण्याच्या दृष्टीने ते गिरनार पर्वतावर गुप्त झाले. पुन्हा काही कालावधीनंतर ” श्रीपाद श्रीवल्लभ” नावाने अवतार धारण करुन स्वतःमात्यापित्याना मी दत्तात्रेय अविनाश चैतन्यरुप आहे हे दाखवून जनकल्याणार्थ तीर्थयातत्रेस गेले. काही काळानंतर भगवान दत्तात्रेयांनी “श्री नृसिंह सरस्वती” या नावाने अवतार घेऊन जनकल्याण करुन श्री क्षेत्र गाणगापूर येथे निगुन पादुकांची आपली खूण सर्वाना साक्षीस ठेऊन शैल्य पर्वताकडे तपश्चर्येसाठी गेले.
यानंतर मात्र बर्याठच कालावधीनंतर श्री समर्थाचे आगमन कर्दळी वनातून झाले. अजानबाहू सगुन मुर्ती अनेक ठिकाणी भ्रमण करीत अक्कलकोटास स्थिरावली व श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज म्हणून लोकांत प्रसिध्दी झाली. श्री स्वामी समर्थ कोठेही असले तरीही ते मनोवेगाने जात येत असत. यांचे अनेक चमत्कार, अनेक लीला. एक ठिकाणी गुप्त होणे, दुसर्याो ठिकाणी प्रगट होणे, दर्शनाला येणार्याक भाविकांच्या मनोकामना पूर्ण होणे अशाप्रकारे समाजामध्ये सत्प्रवृत्ती निर्माण होण्याच्या दृष्टीने कार्य केले. आणि याचमुळे श्री स्वामी समर्थ भगवान दत्तात्रेयांचेच अवतार आहेत हे त्या काळच्या मंडळींना भावले. श्री स्वामी समर्थंकडे अनेक प्रकारची मंडळी त्यामध्ये राव रंक सुध्दा त्यांच्या दर्शनाला येत असत. त्याही सर्वांना योग ते मार्गदर्शन श्री स्वामी समर्थ करत असत.
श्री स्वामी समर्थाच्या पूर्वीचे भगवान दत्तात्रेयांचे अवतार म्हणजे श्री. श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री. नृसिंह सरस्वती. यांनाही त्या त्या काळात सर्वाचे भले केले. अविवेकी मंडळींना आपल्या तपोबलाने सन्मार्गाकडे वळविले. आज मात्र विशेषतः गुरुशिष्य परंपरा पाहायला अनुभवायला मिळेल ती समर्थ अक्कलकोट स्वामी महाराजांचीच.
श्री स्वामींचे बरेच शिष्य होते. त्यांनी स्वामींच्या सान्निध्यात राहून स्वामी संप्रदाय निर्माण केला. इतर अवतारापेक्षाही भगवान दत्तात्रेयाचा अवतार हा चिंरजीव असून ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिगुणात्मक दैवी शक्ती पुर्णत्वाने शाश्र्वत रुपाने अविनाशी आहेत. आणि म्हणून भगवान दत्तात्रेयांच्यापासून सुरु झालेली ही गुरुशिष्य पंरपरा स्वामी समर्थाच्या काळात मोठ्या प्रमाणात वृध्दिंगत झाली आणि ती आजही कार्यरत आहे. आणि ती पुढेही कार्यरत असणार..
माझ्या प्रस्तावना वाचताना कटांळा येऊने म्हणून मध्ये मध्ये काही दुर्लभ गोष्टी माहीती देत आहे……
त्यातील एक पद. ( सध्द्गरुना स्नान घालताना किंवा सध्द्गरु पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद )
चला न्हाणुं त्या गुरुराया || वेदादिक ही स्तविति ब्रम्ह तें सगुण होइ जग ताराया ||धृ||
रत्नखचित चौरंगि बसूवुं या || तैल सुवासिक शिरिं घालूं या | उटणिं अत्तरें अंगिं मर्दूया ||
करुं सेवा प्रभु सुखवाया ||१|| उष्ण सुगंधित जल गंगेचें || घालुनि चोळू अंग प्रभुचें ||
निर्मळ करुनी पुसुं या साचें || चरणिं पादुका लेववुं या ||२|| सुवर्णसूत्रहि कटिला विलसें ||
कौपिन छाटी भगवी नेसे || भरजरि शेला पांघरलासे || ध्यान ठ्सो दिनदासीं या ||३||
( सध्द्गरु सिंहासनारोह अथवा पादुका आसनारोहण, भस्मधारण इ…
रत्नजडित सिंहासन || मृदु सुंदर वरि आसन || त्यावरि देदीप्यमान || स्वामी शोभला ||१||
षडरींतें करुनि भस्म || चर्चियलें अंगिं भस्म || निर्विकार पूर्ण ब्रम्ह || स्वामि शोभला ||२||
संध्या संदेह-हारि || यज्ञोपवितासि धरि || भक्त्-जनांस्तव आचरि || कर्ममार्गहा ||३||
पाध्य पुजा ( पंचामृत पूजा )
पाद पूजा तुला अर्पितो प्रेमला || स्वीकारुनि निर्मला भक्ति देई ||धृ||
दुग्धपदिं अर्पुनी शुध्दजलिं क्षाळिलें अर्पूनियां दही चरण धुतले ||
तूप घालुनियां क्षाळिले पद्-व्दया || मधु सनर्पूनियां शुध्द केले ||१||
शर्करा तदुपरी अर्पियेली वरी || चरण्-कमलें बरीं क्षाळिलीं हीं ||
स्वमिमंत्रे जलें चरण अभिषेकिले || स्वच्छ मग पूसिले विअमल वसने ||२||
पायि त्या पादुका गंध अक्षतबुका || जाति पुष्पांदिकां वाहियेलें ||
पादपूजा अर्पिता स्वामिसी || हर्ष अति मानसीं दीनदासा || ३||
पूजा ( सध्दगुरु अलंकारार्पण )
प्रमपूजा तुला अर्पितों प्रेमला || स्वीकारुनि निर्म्ला भक्ति देई ||धृ||
मुकुट शिरीं रत्नयुक्त हार पदकांसहित|| तुलसिरुद्राक्षयुक्त कंठिं माला ||
चंदनाची उटी चर्चिली गोमटी || कस्तुरी ललाटीं तिलक शोभे ||१||
जाई जुई मोगरा कमल चंपक वरी || पाच तुलसी बरीं बिल्वत्रिदलें ||
वैजयंती, फुलें हार बहु अर्पिले || स्वामिवर तोषले दीनदासीं ||२||
संजिव
क्रमष भाग 2 पुढे..
cont 9423086763/9869008263
अष्टक
संसारी मी बहुत रतलों अंध झालो दिसेना || गेले सकल वय हे मी पणें ते कळेना || चिंताग्नीने हृदय फुअटले काय देवा करू रे || स्वामीराया शरण तुजला पाव आतां मलारे ||१|| भार्या बंधू धन सुत सुता वाटतो सौख्यकारी || या मायेने मज भुलविले होतसे दु:ख भारी || जाणोनी हे फिरफिरुनि मी अंध होतो कसारे || स्वामी राया….. ||२|| शांती अंगी किमपिही नसे षड्रिपू गांजताती || वाटे जीवा तळमळ बहू नावडे देव भक्ती || आसक्तीही सकळ विषयी लागते ही कशी रे || स्वामी राया…. ||३|| नाना ब्याधी बहुत पिडिले क्षीण झालें शरीर || गेली कांती सकळ चपुची चिंती नाही विचार || संततीचा प्रभू मज गमे खेळ तो सर्व हा रे || स्वामी राया……||४|| सर्वस्वी मी प्रभू तव असे नित्य अन्यायी देवा || नाही मते कधिहि घडली स्वामीसेवा || साधूसंता नच नमियले दग्धदैवी खरा रे || स्वामी राया….. ||५|| अज्ञानाने जगती बुडलो सत्य तेही कळेना || सन्मार्गीही प्रभू मम मती प्राण जाता वळेना || जाणीवेचा मद बहु शिरे अगिं माझ्या कसारे || स्वामी राया….. ||६|| जे जे प्राणी शरण तुजला भक्तिभावेंचि येती || त्यांते स्वामी म्हणविसि तुझे गाजते ही सुकीर्ती नाही कोणी तुजसम असे या जगी श्रेष्ठ तो रे || स्वामी राया…. ||७|| स्वामीराया नमन करुणी प्रार्थितो आपणाला || घ्यावे आतां पदरी अपुल्या दीन बालकाला (चाकराला) लोळे प्रेमे तवपर्दि सख्या लीन होवोनिया रे ||८|| या पद्यांते सद्य हृदये नित्य जे आळ्वीती|| साध्दोधासी मानि करुनिंया वागती वागवीती || त्यांची चिंता सतत करिसी वाटते वामनारे || स्वामीराया शरण तुजला पाव आतां मलारे. ||९||
अष्टक
दयाळू खरा सद्गुरू स्वामी माझा || उडी घालितो संकटी भक्तकाजा || गुरुरुप देखोनि हा काळ भ्याला || नमस्कार माझा गुरुराजयाला ||१|| अहो नष्ट होती समंधादि भुते || गुरुचे कृपें पावुनी सद्गतीते || पुसे कोण पापी महा नष्ट त्याला || नमस्कार माझा…. ||२|| किती एक कोडी किती एक कुष्ठी || महाव्याधिशुलें सुसंतप्त होती ||किती प्रार्थिती हाक त्याला || नमस्कार माझा….||३|| जटी तापसी लोक सेवा गुरुची || किती ब्र्मम्हचारी यतीवृंद साची || करोनी सुखे सौख्य देती जाणला || नमस्कार माझा…. ||४|| जयाचे कृपें सर्व संसार माया || सुखे त्यागुअनी सौख्य वाटे जिवा या || महानंद वैराग्य भाग्ये मनाला || नमस्कार माझा…. ||५|| गुरुची कृपा होय ऐसे करावे || गुरुचे सदा नाम घोकीत जावे || गुरु श्रेष्ठ सर्वात हा भाव झाला || नमस्कार माझा….||६|| गुरुची कृपा सत्य ही कामधेनू || जियेचे पुढे लोपले चंद्रभानू || किती कोण वर्णील सड्याशाला || नमस्कार माझा….||७|| गुरुदेव स्वामी समर्थी सभाव || धरी जो अती नम्रतेने सदैव || जगी धन्य तो धन्यही वामनाला || नमस्कार माझा…||८|| गुढी पाडव्याच्या आणि स्वामी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…. संजीव नाईक स्वामीभक्त. ७ मार्च २००८. हि अष्टके माझी वैयक्ति आहेत कॉपी करून नयेत. ७ मार्च २००८. बी. ३०१, वंदना सदन, मनवेलपाडा रोड, विरार (पू) ४०१३०५. दूरध्वनी क्रं ०२५०-२५२१७९८/९८६९००८२६३
wah chaan.
verry good. i like it.
very nice, great, it has power to make every person relax, in its tough times