भाऊबंदकी

2009 मे 25
by माझी दुनिया

            मागच्या आठवडयात लोकसभा निवडणूकांचा निकाल लागला. तो लागण्यापूर्वी वर्तमानपत्रातून नेहमी कोणाचे ना कोणाचे तरी भाकित वर्तवलेले असायचे. त्यात बहुतेकांनी आघाडी किंवा कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही , शिवाय डाव्यांचे पारडे जड असेल, त्यातही डाव्यांकडच्या मागासवर्गीय महिलेचे पारडे जड असेल ( मायावती) तर काहींनी दक्षिणेकडची महिला ( जयललिता) पंतप्रधान ठरवेल , जरी आघाडी चे सरकार आले तरी ते जानेवरी २०१० पर्यंतच सत्तेवर राहील, मनसे ला ४-५ जागा मिळतील अशी अनेक बिनबुडाची भाकिते वर्तवली होती. परंतु मतदारांनी राजकीय पक्षांसकट त्या ज्योतिषांनासुद्धा धोबीपछाड घालून बहुमताने आघाडीला पुन्हा सत्तेवर आणले. ते ही अश्या पद्धतीने की डाव्यांना आपली हुकूमत चालावायची संधीही न मिळता. 

         इथे महाराष्ट्रात तर १२ ठिकाणी मनसे ने युतीला असा काही धक्का दिला की त्यानंतर गेला आठवडाभर राज आणि उद्धव या चुलत बंधूंची भाऊबंदकी चव्हाटयावर आली. केवळ त्यांचेच नाही तर मराठी माणसाचेही हसू झाले आणि मुंबईत दोन ठिकाणी    परप्रांतीय उमेदवार निवडून आले. 

       यापुढे मराठी माणसाला वाली कोण ? हा प्रश्न तर मनात आहेच. पण सध्या तरी तरूण मराठी मतदार मनसे कडे मोठया अपेक्षेने पहात आहे हे सिद्ध झाले. या लेखाद्वारे मला विरोपाद्वारे आलेल्या काही फाईल्स जोडत आहे. त्या वाचकांनी अवश्य वाचाव्या. इतरांनाही पाठवाव्या

mns.pdf

1.pdf

2.pdf

3.pdf

4.pdf

प्रतिक्रिया नाहीत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Note: You can use basic XHTML in your comments. Your email address will never be published.

Subscribe to this comment feed via RSS