Posts Mentioning RSS Toggle Comment Threads | Keyboard Shortcuts

  • माझी दुनिया 3:56 pm on August 18, 2009 Permalink | प्रत्युत्तर  

    तुमच्या कम्प्युटरमध्ये राहतं कोण?

    व्हायरसचा प्रॉब्लेम कधी आला नाही, असा कम्प्युयूझर सापडणं. इंटरनेट, सीडी अथवा पेन ड्राइव्हमधून फोटो, गाणी, व्हिडिओ कम्प्युटरमध्ये लोड करताना अचानक व्हायरस आल्याची सूचना मिळते. त्यामुळे अनेक प्रोग्राम करप्ट होण्याची भीती आपल्याला वाटत असते. पण थोडीशी काळजी घेतली काहीच टेन्शन घ्यायचं कारण नाही.

    via Maharashtra Times.

    कम्प्युटर मिथक…

    तुमची आणि कम्प्युटरची ओळख किती जुनी…? या प्रश्नावर तुम्ही नक्कीच डोकं खाजवाल. जाऊ देत, तुम्ही कम्प्युटरचा वापर करताना फारच काळजी घेता, होय की नाही… या प्रश्नावर तुम्ही पटकन होकारात्मक उत्तर द्याल याची खात्री आहे.

    via Maharashtra Times.

     
  • माझी दुनिया 2:07 pm on July 27, 2009 Permalink | प्रत्युत्तर  

    नागपंचमी आलीय. सापांना पुजण्यापेक्षा त्यांना वाचवायला हवं. त्यासाठी सर्पमित्र मदतीला आहेत.

    पावसाचं पाणी बिळात गेल्याने बेघर झालेले साप मुंबईत अनेक ठिकाणी दिसतायत. पण, सापांना मारण्यापेक्षा त्यांना जंगलात सोडण्यासाठी सर्पमित्रांची मदत घेता येईल.

    पाणी बिळात गेल्यावर साप बाहेर येतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला अंड्यांमधून सापाची पिलं बाहेर पडत असल्याने या काळात अनेक ठिकाणी पिल्लंही दिसतात. यावषीर् मुंबईच्या इतर भागांसह चेंबूर, भांडूप, घोडबंदर अशा अनेक भागांमध्ये असे साप दिसतायत. दर पावसाळ्यात असे चारशे ते पाचशे साप पुन्हा जंगलात सोडले जातात. गेली २७ वर्षं सर्पमित्र म्हणून काम करत असलेल्या अनिल कुबल यांनी यावषीर् सुमारे ६५ साप सोडवलेत.

    शहरात नाग आणि घोणस हे दोन विषारी साप सहज नजरेस पडतात. नागाने फणा काढल्यावर तो लक्षात येतो. तर, घोणसच्या अंगावर रुदाक्षांसारखे ठिपके असतात. याशिवाय धामण आणि पाणधिवड सर्रास आढळतात. ते विषारी नसतात. पण अनेकदा लोक विषारी, बिनविषारी न पाहता सापांवर हल्ला करतात. काही वेळेला विषारी सापांशीही मुलं खेळतात. यासाठी लोकांमध्ये जागरुकता येणं गरजेचं आहे. शहरापेक्षा गावात अंधश्रद्धा आणि अज्ञानामुळे साप मारण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. तिथे महाराष्ट्र अॅनिमल रेस्क्यू ऑपरेशनअंतर्गत सर्प वाचवा, निसर्ग वाचवा मोहीम सुरू झाली आहे, अशी माहिती या संस्थेचे संचालक सुनिल कदम यांनी दिली.

    सापांची दहशत अनेकांना असते, अशा वेळी साप पकडून त्यांना जंगलात सोडण्याचं काम गेली नऊ वर्षं करणाऱ्या माया भिसे या तरुणीलाही वन विभागाकडून अधिकृत ओळखपत्र देण्यात आलं आहे.

    थोडी खबरदारीही घ्या

    काही वेळा सापांना सोडवताना पुरेशी काळजी न घेतल्याने अपघात होतात. साप पकडल्यावर त्यांना तातडीने काळोखात वेगळं ठेवणं गरजेचं असतं. पण कुतूहलाने जमा झालेल्या माणसांच्या गदीर्मुळे साप बिचकतो. सापांना ठेवण्यासाठी गोणी किंवा बिन्नीच्या पिशव्या वापरणं योग्य ठरतं. धामण चपळ असते, तिला पिशवीत कोंडून ठेवल्यास त्रास होतो. हे साप २४ तासांत जंगलात सोडणं आवश्यक असतं. पण एका सापाला सोडण्यासाठी जंगलात जाणं अनेकदा पुढे ढकललं जातं. हे साप घरातच अनेक दिवस पडून राहिल्यामुळे आणि योग्य ते वातावरण न मिळाल्याने त्यांचा जीव जातो. मण्यार ही निशाचर आहे. तिला दिवसा जंगलात सोडल्यास वातावरणाशी लगेच जुळवून घेणं तिला कठीण जातं. सापांची अशी काळजी घेत नसलेल्यांना सर्पमित्र म्हणू नये, असे आवाहन ‘बीएनएचएस’चे प्रोग्राम ऑफिसर निखिल भोपळे यांनी केलंय.

    ……..

    ताबडतोब कळवा

    सर्पमित्रांची संख्या वाढल्यावर तिथे अनिष्ट गोष्टींचाही शिरकाव झाला. सापांना पकडून त्यांचं विष आणि कातडीचा चोरटा व्यापार करण्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र वनविभागाने सहा महिन्यांपूवीर् सर्पमित्रांना ओळखपत्रं दिली. अशा काही सर्पमित्रांचे हे फोन नंबर :

    सुनिल रानडे, परळ – ९८२१२८६५४५

    अनिल कुबल, सायन – ९९६९१९३३९६

    सुनिल कदम, सायन – ९८२२७१९३०७

    भरत जोशी, ऍन्टॉप हिल – ९२२१५८०८८८

    मयूर कामत, अंधेरी – ९३२४२४६१०९

    केदार भिडे, बोरिवली – ९८६७२००२८०

    वैभव पाटील, बोरिवली – ९८६८९२२१२०

    कैवल्य वर्मा, बोरिवली – ९८६९३३१४९०

    सुनीश सुब्रमण्यम – ९८३३४८०३८८

    माया भिसे, कळवा – ९८३३७५३२५८

    अरूण नलावडे, मुलुंड – ९००४०७४१४०

    अभय पावगी, ठाणे – ९९६७५७४८१३

    वैभव कुलकणीर्, डोंबिवली – ०२५१२४३४९२९

    अजित म्हात्रे, अंबरनाथ – ९८९००९२५३१

    अरूण बिलारे, कल्याण – ९९८७००२०८९

     
    • आल्हाद alias Alhad 10:04 pm on ऑगस्ट 5, 2009 Permalink | प्रत्युत्तर

      उपयुक्त माहिती…
      धन्यवाद.

  • माझी दुनिया 10:31 pm on February 23, 2009 Permalink | प्रत्युत्तर  

    मूळ दुवा

    टॅक्सी-रिक्षा-ऍम्ब्युलन्ससाठी शोधाशोध… सर्व हार्ट पेशंटांच्या समस्येचे हेच ‘पल्स’ ओळखून एशिअन हार्ट इन्स्टिट्युटने प्रभावी उतारा शोधून काढला आहे. अवघ्या १५ मिनिटांत घरासमोर उभ्या राहणाऱ्या सुसज्ज ‘काडिआर्क ऍम्ब्युलन्स’ हॉस्पिटलने उपलब्ध केल्या आहेत. त्यासाठी तयार केलेली १२६ १२६ ही हेल्पलाइन सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली.

    दिलासा :

    * इमर्जन्सी वैद्यकीय माहिती

    * दिवसा अर्ध्या तासात, रात्री १५ मिनिटांत दारात अॅम्ब्युलन्स

    * जवळचे हॉस्पिटल, तातडीच्या उपाययोजनेचे मार्गदर्शन. हॉस्पिटल निवडीचे स्वातंत्र

    * सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांना ऍम्ब्युलन्स सेवा मोफत. इतरांना दीड हजार रु.

    * एअर ऍम्ब्युलन्स सध्या नाशिक, पुणे शहरांपुरती

    * बीएमसीच्या निर्णयामुळे मुंबईत बिल्डिंगवर हेलिपॅड उभारल्यावर शहरातही हवाई ऍम्ब्युलन्स

    * एअर ऍम्ब्युलन्ससाठी ताशी (फ्लाइंग अवर) ८५ हजार रु.

    * एशिअन हार्ट इन्स्टिट्युटमध्ये दाखल होणाऱ्यांना स्टेट बँकेकडून १० टक्के व्याजाने ५० हजार रु.चे ‘स्पॉट लोन’. सहा महिन्यांत फेडण्याची मुभा. न परवडणाऱ्यांना ट्रस्टकडून मदत.

     
  • माझी दुनिया 6:28 pm on February 11, 2009 Permalink | प्रत्युत्तर  

    खिचडी

    खिचडी म्हटलं म्हणजे झटपट घेणारा पुलावा, त्याबरोबर कुठलीही आमटी नको किंवा डाळ नको. चवीला लोणचं किंवा पापडच छान लागतो.

    विण्टर सूप

    एका पॅनमधे बटर गरम करून त्यात आल-लसूण पेस्ट घालून परवून घ्या. त्यात सर्व भाज्या, टोमॅटो, मिरची, पाणी आणि मीठ घालून एक उकळ काढा.

    वॉव स्ट्रॉबेरी

    फक्त उन्हाळ्यात हिलस्टेशनला जायची फॅशन केव्हाच मागे पडली आहे. सध्या ट्रेण्ड आहे तो, प्रत्येक सिझनमधे हिलस्टेशनला जाण्याचा.

    लो-कॅल ड्रिंक

    हवेत जरा गारवा वाढला की गरमागरम सुप पित टीवी बघणं. स्वेटर घालून थोडंसं फिरायला जाणं. हे होतंच. थंडी असल्यामुळे रक्ताभिसरण हळू होतं.

    शॉर्ट अॅण्ड स्वीट

    तीळ अर्धा तास दुधामधे भिजत घालावेत. नंतर ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावेत.

    हेल्दी सॅलड्स

    हेल्दी सॅलड्स म्हणजे कच्चा भाज्या आणि मोड आलेले दाणे. याचप्रमाणे बेबी स्पिनाच म्हणजे एकदम कोवळा पालक. फक्त साफ करून सॅलड््समधे टाकता येतो.

    झटपट आणि हेल्दी

    आजच्या रेसिपीज साध्या आणि लवकर कशा बनतील अशा आहेत. जरूर तुम्हाला फायदा होईल.

    ऑइल फ्री व्हेजस्टफ

    भरलेले बहुतेक पदार्थ तेलात किंवा तुपात तळलेले असतात. कॅलरी कॉन्शस असणाऱ्यांना ते खाता येत नाहीत. त्यामुळे हेच पदार्थ ऑइल-फ्री कसे करावेत यासाठी ऑइल फ्री व्हेजस्टफ देत आहे.

    भरलेली वांगी

    वांगी धुऊन स्वच्छ साफ करावीत. त्याला उभे दोन चिरा द्याव्यात.

    डाळ आणि घोसाळे कोफ्ता

    घोसाळे किसून घ्यावं. त्याला हळद आणि मीठ लावून निथळून घ्यावं, म्हणजे सर्व पाणी निघून जाईल. त्यानंतर मूगडाळीचं पीठ त्यात टाकून त्यावर सर्व साहित्य टाकून निट मळून घ्यावं.

    चवदार लोणची

    मोठी आठ ते दहा गोड बोरं. साखर एक टीस्पून. लिंबूरस अर्धा टीस्पून.

    सुरण-भोपळा भाजी

    अर्धा किलो सुरण अर्धा किलो भोपळा (लाल) तीन-चार हिरव्या मिरच्या दोन चमचे शेंगदाण्याचा कूट….

    मौसम सुकामेव्याचा

    प्रत्येक सिझनसाठी वेगवेगळी बेगमी करावी लागते. पावसाळ्याचा मुकाबला करण्यासाठी पापड, कुडर््या, लोणची, मुरांबे, सुकी मासळी ही रसद गोळा करून ठेवावी लागते.

    हेल्दी पराठे

    पराठा हा एक जेवणातला महत्त्वाचा घटक आहे. हा एक ब्रेड किंवा चपातीचा एक वेगळा प्रकार आहे. साधारणत: सर्व पराठे गव्हाच्या पिठापासून बनवतात. त्यामुळे शरीरास पण उपयुक्त असं ठरतं. पाश्चात्त्य देशात पण गव्हापासून बनवलेले प्रकार खाण्यास सुरुवात झाली आहे.
     
  • माझी दुनिया 12:05 am on April 6, 2008 Permalink | प्रत्युत्तर  

    ब्रह्मादेवाने हे जग चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले असे पुराणात सांगितलेले आहे. त्यामुळे विश्वाचा वाढदिवस या गुढीपाडव्याला साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो. या दिवसासंबंधी विविध आख्यायिका प्रचलित आहेत. त्या अशा :

    १. शालिवाहन शकासंबंधी दोन कथा सांगितल्या जातात. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराने मातीचे सैन्य तयार करून त्यांच्यात जीव भरला आणि त्यांच्या मदतीने शत्रूचा पाडाव केला. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन नृपशक सुरू झाला. म्हणजे मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निजीर्व झालेल्या समाजामध्ये त्याने चैतन्य निर्माण केले असावे. समाजात स्वाभिमान, अस्मिता जागृत केली असावी.

    दुसऱ्या कथेप्रमाणे शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचातून जनतेची मुक्तता केली. या विजयाप्रीत्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शकाला प्रारंभ झाला. या वषीर् शालिवाहन शक १९३० चा प्रारंभ होत आहे. ज्यांनी विजय मिळविला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळविला ते ‘शक’ असा दोघांचाही अंतर्भाव ‘शालिवाहन शक’ यामध्ये करण्यात येतो.

    २. वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजैंद झाला. स्वर्गातील अमरेंदाने चैत्र शुक्ल प्रतिपदेला वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो.

    ३. भगवान श्ाी विष्णूंनी प्रभु रामचंदाचा अवतार घेऊन रावणासह दुष्ट राक्षसांचा पराभव केला. रावणाला ठार मारले. त्यानंतर प्रभु रामचंदानी चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी जनतेने गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून दर चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढ्या तोरणे उभारून आनंदाचा विजयोत्सव दिन साजरा होऊ लागला.

    गुढीपाडवा असा साजरा करावा!

    गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची व परिसराची स्वच्छता करावी. अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावीत. दरवाजासमोर रांगोळी काढावी. देवांची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. वेळूची (बांबूची) काठी घेऊन ती स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे वस्त्र, फुलांची माळ, साखरपाकाची माळ घालून त्यावर एक लोटी उपडी ठेवावी. अशारितीने तयार केलेली गुढी, दारासमोर रांगोळी घालून उभी करावी. या गुढीस पूजा करून कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव, मीठ व ओवा इत्यादी घालून ते मिश्ाण चांगले वाटावे आणि घरातील सर्वांनी थोडे थोडे खावे. पंचपक्वान्नाचे भोजन करून तो दिवस आनंदात घालवावा. या दिवशी चांगल्या कामाचा शुभारंभ करावा.

    अमेरिकेच्या नॅशनल सायन्स अकादमीने ‘नीम : ए ट्री फॉर सॉल्विंग ग्लोबल प्रॉब्लेम्स’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कडूनिंबाचे फार महत्त्व आहे. म्हणूनच गुढीपाडव्याला कडूनिंब भक्षणाचे महत्त्व आहे.

    निम्बस्तिक्त : कटू : पाकेलघु : शीतोह्यग्नि-वात-कृत।

    ग्राही हृद्यो जयेत् पित्त-कफ-मेह-ज्वर-कृतीन्।।

    कुष्ठ-कासारूपी हल्लास-श्ववथु-व्रणात्।

    भूक न लागणे, उलट्या होणे, आम्लपित्त, कावीळ, मूळव्याध, पोटदुखी, पोटात जंत होणे, डोक्यात उवा होणे, वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग, व्रण, जखमा, दाहरोग, विंचूदंश, सर्पदंश, अकाली केस पांढरे होणे, वेगवेगळ्या प्रकारचे ज्वर (ताप) मुखरोग, दातांचे आजार, नेत्रदोष, स्त्रियांचे आजार, सांधेदुखी इत्यादी आजारांवर कडूनिंब उपयुक्त आहे. मात्र तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच याचा उपयोग करावा. अति कडूनिंब सेवन आरोग्यास अपायकारक असते. जंतुनाशक म्हणूनही कडूनिंब उपयुक्त आहे.

    पंचांगाचे महत्त्व

    गुढीपाडव्यापासून, नवीन शालिवाहन शकवर्षारंभापासून नवीन पंचांगाची सुरुवात होते. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्ाावण, भादपद, आश्विन, कातिर्क, मार्गशीर्ष, पौष, माघ व फाल्गुन हे चांद-महिने एकामागोमाग येत असतात. भारतीय कालमापनात ऋतू व सण यांनी सांगड घातलेली आहे. त्यासाठी सौर व चांदपद्धतीचा मेळ घातलेला आहे. महिन्यांची नावे व आकाश यांचाही संबंध आहे. चैत्र महिन्यात चित्रा नक्षत्र रात्रीच्याप्रारंभी पूवेर्ला उगवून पहाटे पश्चिमेस मावळते. वैशाख महिन्यात विशाखा! ज्येष्ठात ज्येष्ठा! तसेच त्या महिन्यांच्या पौणिर्मेला चंद त्या त्या नक्षत्रापाशी असतो. म्हणजे चैत्र पौणिर्मेला चंद चित्रापाशी! जानेवारी-फेब्रुवारीचे तसे नसते.

    कलियुगाची एकंदर ४ लक्ष ३२ हजार वषेर् आहेत. त्यापैकी पाच हजार १०९ वषेर् झाली. येत्या रविवारी गुढीपाडव्याला ५११० वर्षांचा प्रारंभ होईल. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पाच अंगानी पंचांग बनते. इ.स.पूर्व १५०० वर्षांपासून तिथी प्रचारात आहेत. इ.स. पूर्व एकहजार वर्षांपासून वार प्रचारात आहेत. नक्षत्रेही इ.स.पूर्व १५०० वर्षांपासून प्रचारात आहेत. ‘योग’ हे पंचांगातील चौथे अंग इ.स. ७०० नंतरच प्रचारात आले. पाचवे अंग ‘करवा’ हे इ.स.पूर्व १५०० पासून प्रचारात आले. पंचांग म्हणजे आकाशाचे वेळापत्रक! वर्षभरातील खगोलीय घटनांचे वेळापत्रक पंचांगात असते. पंचांगे ही सूर्यसिद्धांत, ग्रहलाघव, करणकल्पकता या करणग्रंथांवरून तयार केली जात. सध्या पंचांगे ही संगणकावर तयार केली जातात. ती जास्त सूक्ष्म असतात.

    दा. कृ. सोमण

     
c
एक नविन पोस्ट तयार करा
j
next post/next comment
k
previous post/previous comment
r
उत्तर द्या.
e
edit
o
प्रतिक्रिया दाखवा/लपवा
t
वर जा
l
go to login
h
show/hide help
esc
cancel