Posts Mentioning RSS Toggle Comment Threads | Keyboard Shortcuts

  • माझी दुनिया 2:17 pm on July 27, 2009 Permalink | प्रत्युत्तर  

    शिवसेनेने अन्य राजकीय पक्षांना मागे टाकत कॉर्पोरेट धर्तीवर अद्ययावत असे कॉल सेंटर सुरु केले असून पक्षाचा धागा सामान्य माणसाशी जुळलेला राहावा यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाशी आगळी जवळीक केली आहे.
    शिवसेना कॉल सेंटरमध्ये एखाद्या विभागातील कामाविषयी तक्रार आली की, ती प्रथम ती तेथील शाखाप्रमुख, नगरसेवक अशा क्रमाने विभागप्रमुखापर्यंत पाठवली जाते. महत्त्वाचे म्हणजे या तक्रारीचा पाठपुरावा केला जातो. त्यामुळे तक्रार करणाऱ्याचा या सेवेला धन्यवाद देणारा दूरध्वनी बहुधा दुसऱ्या वा तिसऱ्या दिवशी येतो, असा कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे. या सेवेत तक्रार करणाऱ्याचे नाव, दूरध्वनी क्रमांक, पत्ता, त्याने किती वेळा दूरध्वनी केला आहे हे सारे नोंदले जाते. कुणी खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न केला तर तो दूरध्वनी क्रमांक काळ्या यादीत टाकला जातो.
    कॉल सेंटरशी केवळ मराठीच नव्हे तर कित्येक अमराठी मुंबईकरही संपर्क साधतात याचे कारण त्यांचा शिवसेनेवरचा विश्वास, असे सांगून शैलेश म्हणाले की, अगदी गरिबातल्या गरीबालाही शिवसेना कॉल सेंटरशी संपर्क साधायचा असेल तर त्याच्यासाठी १८०० २२२ ७७२ हा टोल फ्री क्रमांक सेवेत आहे. आपल्या दूरध्वनीवरून २४२२२२२२ हा क्रमांक फिरवा. पलीकडून जय महाराष्ट्र, अशा स्वागतानंतर तुमच्या तक्रारीची विचारणा होईल. तुमची समस्या सुटण्यासाठीच्या प्रयत्नांचा प्रवास मग सुरु होईल.

     
    • तो 11:57 pm on जुलै 28, 2009 Permalink | प्रत्युत्तर

      वाह फारच छान….
      जय महाराष्ट्र!!!

      http://to99.wordpress.com/

    • deepak vasudeo rane 10:35 pm on ऑगस्ट 19, 2009 Permalink | प्रत्युत्तर

      shivasenach he sarva karu shakate. abhinandan..

      khoooooop utkrusta upkaram…..

      dhanyavad. jay maharastra!!!

      deepak rane

    • Ankush 4:22 pm on ऑगस्ट 20, 2009 Permalink | प्रत्युत्तर

      Thanks Sir

      jay maharashtra

    • nitin gole 5:11 pm on ऑगस्ट 24, 2009 Permalink | प्रत्युत्तर

      jay maharashtra,

      he kaam kewal shivsenach karu shakte,karan hyaacha anubhav mala ekda Aala aahe.magchyavarhi mi mazya gadichya (bus)sandhrbhat shivsena bhavan yethe gelo hoto.tethe mala shivsena sachiv shree anil desai saheb bhetale hote.v tyani jatine lakshya ghlun maze kaam purna kele v mazi bus eka banke chya lafdyatun mukt zali. vmala maza rojgaar milala.
      tya baddal tyancha v shivsenech mi runi aahe,
      asich jantechi seva shivsenene karavi hi vinanti, v call centre kdhalyamule jantela tyacha lavkar phayada hoil.tya baddal dhanyawad.
      jay hind jay maharashtra jay shivsena

    • nandkishor dambale 2:23 pm on ऑगस्ट 26, 2009 Permalink | प्रत्युत्तर

      mi maharastracha maharastra maza mag ks nako aplya matichi godi marathi hi maharastrachi mhnunach bhagwa nehami phadakt rahil jai maharastra

    • dinesh yewale 9325485472 5:30 pm on ऑगस्ट 28, 2009 Permalink | प्रत्युत्तर

      ajunhi bothad jhali nahi dhar balasahebachya talwarichi,
      kunachi himmat nahi shivsenela sampavnyachi.
      ghaslyashivay dhar yet nahi talwarichya patila,
      balasaheb-udhdhav-shivsena shivay paryay nahi majhya marathi matila.

      balasahebanchi darkali sarya maharashtrala punha ekda aikaila milel,balsahebanchya mawlyanno tayyar raha.

    • Santosh Agiwale 12:18 सकाळी on ऑक्टोबर 9, 2009 Permalink | प्रत्युत्तर

      Samor Yenari aavane tychaverch phiravate
      Yevadi himt phakta Shivsenacha karu shakte
      jai Maharastra

    • AMARDEEP YADAV 12:03 pm on ऑक्टोबर 9, 2009 Permalink | प्रत्युत्तर

      jai maharashtra,

      namshkar shaheb je khare shivsainik ahe tyana kon wicharat nahi pan je paksha chya nava khali faqt mote pana kartat tyana jast maan ahe.amhi tyatle nahi ahot je jinklya nanter mothe pana karayla yetat.amhi shiv sainik ahot anhi hya phude sudha rahnaar.

    • rohan 2:31 pm on ऑक्टोबर 21, 2009 Permalink | प्रत्युत्तर

      shivsenecha vijay aaso shivsena jindabad

  • माझी दुनिया 10:31 pm on February 23, 2009 Permalink | प्रत्युत्तर  

    मूळ दुवा

    टॅक्सी-रिक्षा-ऍम्ब्युलन्ससाठी शोधाशोध… सर्व हार्ट पेशंटांच्या समस्येचे हेच ‘पल्स’ ओळखून एशिअन हार्ट इन्स्टिट्युटने प्रभावी उतारा शोधून काढला आहे. अवघ्या १५ मिनिटांत घरासमोर उभ्या राहणाऱ्या सुसज्ज ‘काडिआर्क ऍम्ब्युलन्स’ हॉस्पिटलने उपलब्ध केल्या आहेत. त्यासाठी तयार केलेली १२६ १२६ ही हेल्पलाइन सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली.

    दिलासा :

    * इमर्जन्सी वैद्यकीय माहिती

    * दिवसा अर्ध्या तासात, रात्री १५ मिनिटांत दारात अॅम्ब्युलन्स

    * जवळचे हॉस्पिटल, तातडीच्या उपाययोजनेचे मार्गदर्शन. हॉस्पिटल निवडीचे स्वातंत्र

    * सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांना ऍम्ब्युलन्स सेवा मोफत. इतरांना दीड हजार रु.

    * एअर ऍम्ब्युलन्स सध्या नाशिक, पुणे शहरांपुरती

    * बीएमसीच्या निर्णयामुळे मुंबईत बिल्डिंगवर हेलिपॅड उभारल्यावर शहरातही हवाई ऍम्ब्युलन्स

    * एअर ऍम्ब्युलन्ससाठी ताशी (फ्लाइंग अवर) ८५ हजार रु.

    * एशिअन हार्ट इन्स्टिट्युटमध्ये दाखल होणाऱ्यांना स्टेट बँकेकडून १० टक्के व्याजाने ५० हजार रु.चे ‘स्पॉट लोन’. सहा महिन्यांत फेडण्याची मुभा. न परवडणाऱ्यांना ट्रस्टकडून मदत.

     
  • माझी दुनिया 4:27 pm on October 30, 2007 Permalink | प्रत्युत्तर
    Tags:   

    * भाजीतल्या कॉलिफ्लॉवरचा रंग पांढराच राहावा यासाठी शिजवताना त्यात थोडं दूध घालावं.

    * अॅल्युमिनिअमची भांडी ‘पांढरी’ दिसावीत यासाठी त्यात थोडी सफरचंदाची सालं उकळावीत. नंतर ते भांडं धुवून वाळवावं.

    * अंडी उकडताना कवच फुटून आतला भाग बरेचदा बाहेर येतो. हे टाळण्यासाठी अंडी उकडताना त्यात एक टीस्पून व्हिनेगर घालावं.

    * केकला बरेचदा अंड्याचा वास येतो. तो येऊ नये यासाठी केकच मिश्रण फेटत असताना त्यात एक टेबलस्पून मध घालावं.

    * मशरूम सहजपणे पाणी शोषून घेतं. इतकंच काय ते हवेतलं आर्दही शोषून घेतं. म्हणून भाजीत ते वापरण्यापूवीर् धुण्याऐवजी स्वच्छ कपड्याने पुसावेत.

    * बटाट्याला कोंब फुटू नयेत यासाठी त्यात एक सफरचंद ठेवावं.

    * भेंडीची भाजी चिकट होऊ नये यासाठी ती शिजत असताना त्यात चमचाभर लिंबाचा रस किंवा दही घालावं.

    * अंडं जमिनीवर पडून फुटलं तर ती जागा स्वच्छ करणं जिकिरीचं बनतं. अशावेळी फुटलेल्या अंड्यावर भरपूर मीठ घालावं. थोड्यावेळाने पेपर नॅपकिनने ते स्वच्छ करावं.

    * हिरव्या भाज्या कधीही प्लास्टिकच्या पिशवीत साठवून नयेत. त्या लवकर कुजतात.

    * कांदा शिजवताना त्यात थोडं मीठ घालावं. अशाने तो लवकर शिजतो.

    - मैत्रीण

     
    • kasa kaay 2:59 सकाळी on ऑक्टोबर 31, 2007 Permalink | प्रत्युत्तर

      ह्या युक्त्या छान आहे. फक्तं एक गोष्टं खटकली. ती म्हणजे खाद्य पदार्थ पांढरे दिसण्याचा अट्टाहास. आहार शास्त्रज्ञांच्या मते नैसर्गिकपणे विविध रंगांनी नटलेले जेवण आरोग्याच्या दृष्टीन जास्तं चांगले असते.
      पांढर्‍या रंगाच्या आकर्षणापायी आपण बरीच जिवनसत्वे गमावुन बसतो. उदा. तांदुळ, साखर आणि मीठ यांना पांढरे करण्यासाठी आपण मुळ पदार्थातील उपयुक्तं गोष्टी फेकुन देतो.

  • माझी दुनिया 5:17 pm on October 29, 2007 Permalink | प्रत्युत्तर
    Tags:   

    * डोसे मऊसूत बनवायचे असतील तर उडदाची डाळ आणि तांदूळ वाटाताना त्यात थोडा भात घालावा.

    * तांदळाला किड लागू नये म्हणून त्यात लसणाच्या पाकळ्या किंवा हळदीचे तुकडे ठेवावेत.

    * आमटीत मीठ जास्त झालं असल्यास ते अॅडजस्ट करण्यासाठी त्यात थोडं भाजलेलं तांदळाचं पीठ घालावं.

    * दही खूपच आंबट असेल तर त्यात चार कप पाणी घालावं. अर्ध्या तासानंतर वर जमलेलं पाणी काढून टाकावं.

    * डाळ शिजवताना त्यात थोडा लसूण घालावा. अशाने पोटाला त्रास होत नाही.

    * तांदळाचं पीठ आणि बेसन दीर्घकाळासाठी साठवायचं असल्यास ते प्लास्टिकच्या पिशवीत ठेऊन मग फ्रीजमध्ये ठेवावं.

    * मीठाच्या गुठळ्या होऊ नयेत यासाठी त्यात चिमूटभर कॉर्नफ्लॉवर घालावं.

    * घट्ट सायीसाठी दुधाच्या भांड्याला मलमलचा कपडा गुंडाळून ते रात्रभर फ्रीजमध्ये ठेवावं.

    * अंड उकडल्यानंतर ते पाच मिनिटं थंड पाण्यात ठेवावं. अशाने त्याचं कवच सहजपणे निघतं.

    - मैत्रीण टीम

    Technorati Tags:

     
    • chetan 1:31 pm on नोव्हेंबर 18, 2007 Permalink | प्रत्युत्तर

      that gr8..!!

    • mehek 7:36 pm on डिसेंबर 10, 2007 Permalink | प्रत्युत्तर

      wow realy very helpful

  • माझी दुनिया 3:48 pm on September 4, 2007 Permalink | प्रत्युत्तर
    Tags:   

    [ Thursday, August 23, 2007 01:03:14 am]

    * डोळ्यांना थंडावा देण्यासाठी ‘कूल पॅक’ बनवावा. यात काकडीच्या जाड कापांबरोबरच थंड दुधात भिजवलेल्या कापसाच्या बोळ्यांचाही वापर करता येईल.

    * तांदळात किडे होऊ नयेत म्हणून डब्यात लसणाच्या पाकळ्या किंवा हळदीचे तुकडे घालावेत.

    * तांदूळ किंवा गव्हाच्या पीठाला ओल पकडू नये म्हणून त्यात एक तमालपत्र घालावं.

    * मटार उकडताना त्यात चिमूटभर साखर घातल्यास त्यांचा रंग बदलत नाही.

    * अंडी उकडून झाल्यानंतर पाच मिनिटं थंड पाण्यात ठेवावीत. अशाने त्यांचं कवच झटपट निघतं.

    * अनेकदा अंड्याचा केवळ पांढरा भाग वापरला जातो. अशावेळेस पिवळा भाग कसा साठवायचा, हा प्रश्ान् पडतो. हा पिवळा भाग एका भांड्यात घेऊन तो बुडेल इतपत पाणी किंवा दूध त्यात घालावं. नंतर हे पाणी किंवा दूध काढून फक्त तो भाग वापरता येतो.

    - मैत्रीण टीम

     
c
एक नविन पोस्ट तयार करा
j
next post/next comment
k
previous post/previous comment
r
उत्तर द्या.
e
edit
o
प्रतिक्रिया दाखवा/लपवा
t
वर जा
l
go to login
h
show/hide help
esc
cancel